हात जोडुनी मीच विनवते, वाट वाकडी करू नका….
माझ्या प्रिय लेकरांनो, मी धरतीमाता. तुम्हाला वसुंधरादिनानिमित्त काही सांगू इच्छिते. आजचा दिवस २२ एप्रिल हा ‘वसुंधरा दिन’ म्हणून पाळता. मात्र गेली कित्येक वर्ष वसुंधरा दीऽऽऽऽन होत चालली आहे. खरं तर वसुंधरा या माझ्या नावाप्रमाणे मी वसु म्हणजे संपन्न समृध्द होते. माझी नैसर्गिक संपदा अफाट होती असं म्हणू या. होती असच म्हणाव लागेल कारण शहाणा माणूस अस नाव धारण करणार्या माझ्या लेकरा, तू मला लक्तर बहाल केलीस. तुझी वृत्ती जेव्हा व्यापारी बनली तेव्हा माझा सखा, जल जो पावसाच्या रूपानं मला भेटतो आणि चराचराला सुखावतो. त्याला ही ’पैसा झाला खोटा’ असं म्हणून डिवचतोस आणि त्यामुळे अनेकदा त्याच्या प्रकोपाचाही बळी ठरतोस. माझी संपत्ती घेऊन, खर तर लुटून त्याबदल्यात तू मला काय काय दिलं आहेस? विषारी वायु, न विघटन होणारे प्लास्टिक, जास्त उत्पादन होण्यासाठी रासायनिक खतांचा आणि घातक कीटकनाशके. त्यांच्यामुळे जलस्त्रोत आणि हवाही विषारी झाली. तुमच्या चैनी, सुखसोई यासाठी – ज्याला तुम्ही ’विकास’ असे भुलवणारे, आकर्षक नांव देता, माझ्या हिरव्यागार वनांच्या शालू शेल्याची लक्तरे केलीत. ’पृथ्वी केवळ माणसांसाठीच’ अशा स्वार्थी वृत्तीमुळे माझ्या इतर काही लेकरांना म्हणजे पशुपक्ष्यांना निर्वंश केलंत. खरं तर माझी आजची अवस्था एखाद्या अतिदक्षता विभागातील रुग्णासारखी आहे, जागतिक तापमानवाढ माझ्या ज्वराचे मापक, झाडं कमी झाल्याचाही तो एक परिणाम, खेरीज झाडं नसल्यानं मला कृत्रिम श्वासोच्छवासावर ventilator वर ठेवल्यासारखं आहे. ओझोनच्या विरळीकरणामुळॆ घातक सूर्यप्रकाश मला भाजून काढत आहे.
पुराणातील संकल्पनेनुसार माझा भार शेषनागाने स्वत:च्या मस्तकावर तोलला आहे. पण माझ्या लेकरांनो तुम्ही केलेल्या पापांचे हे वजन या शेषाला जड होत आहे आणि मग त्याने संतापाने डोकं हलवल्यावर माझी तारांबळ होते. भूकंप, ज्वालामुखी अगर महाप्रलयासारख्या आपत्तींना अखेर तुम्हालाच तोंड द्याव लागतं.
ही पुराणकथा म्हणून भाकडकथा असं मानू नका. Lovelock नावाच्या वैज्ञानिकाने मला मूलत: सजीव मानले आणि १९७० साली Gaia Hypothesis अशी संकल्पना मांडली. Gaia या ग्रीक संज्ञेचा अर्थ आहे Mother Earth.
तुम्ही तुमचा चंगळवाद थोपवा आणि जरा सुधारा, तुम्ही सर्व चराचराचे मालक नसून विश्चस्ताच्या भूमिकेत जा आणि ’शहाणा माणूस’ हे आपलं नावं सार्थ करा एवढी तुम्हाला विनंती.
स्वार्थसाधना की आॅंधी में वसुधा का कल्याण न भुलें ।
LikeLike
माता वसुंधरा म्हणते,
“काही जण मला निसर्ग म्हणतात
तर काही म्हणतात सृष्टी माता.
मी इथे गेल्या साडे चार अब्ज वर्षांपासून आहे.
तुमच्यापेक्षा बावीस हजार पाचशे पट अधिक काळ मी इथे वास करतेय.
मला काही माणसांची गरज नाही पण माणसांना माझी गरज आहे.
हो, तुमचं भवितव्य माझ्यावर अवलंबून आहे.
जेव्हा माझी भरभराट होते, तेव्हा तुमचीही भरभराट होते.
जेव्हा मी अशक्त होते, तेव्हा तुम्हीही अशक्त होता… किंवा त्याहीपेक्षा वाईट.
पण मी इथे प्राचीन काळापासून आहे.
तुमच्यापेक्षा मोठ्या जातीचे जीव मी पोसले आहेत आणि उपाशीही मारले आहेत.
माझा महासागर, माझी माती, माझे प्रवाह, माझी अरण्ये…
हे सगळे तुमचा घास घेऊ शकतात किंवा जीवदानही देऊ शकतात.
रोज जगताना तुम्ही मला लक्षात ठेवता कि दुर्लक्ष करता ह्याने मला काहीच फरक पडत नाही.
ह्या किंवा त्या मार्गाने, तुमच्या कृतीवर ’तुमचं’ प्राक्तन निश्चित आहे, माझं नाही.
मी निसर्ग आहे. मी पुढे जातच राहीन.
मी मी उत्क्रांतीसाठी तयार आहे.
तुम्ही आहात?”
LikeLike
सगळ्यात जास्त कर्ब उत्सर्जन विकसित व अतिविकसीत देश करतात.पॕरिस करारातून अमेरिका बाहेर पडला.त्याचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत.भारत सुद्धा कर्ब कमी उत्सर्जन होईल याची काळजी घेतच आहे.
केवळ कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हा विकास थांबू शकत नाही. याचे कारण म्हणजे विकसनशील देशांना विकासाचा नैसर्गिक अधिकार आहे आणि तो कोणीही डावलू शकत नाही. त्यामुळे आता आपला विकास शाश्वत कसा होईल यासाठी ऊर्जेचे नूतनीकरणक्षम स्रोत विकसित करून त्यानुसार आपले विकासाचे उद्दिष्ट गाठणे हाच रास्त पर्याय भारतासमोर आहे आणि तो आपण स्वीकारला आहे. याउलट विकसित देश मात्र त्यांच्या ऊर्जाभिमुख सुखलोलुप जीवनशैलीमध्येच अडकले आहेत.
उदय मोहोळे.
LikeLike